मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज पहाटे ४.३० वाजता मुंबईत निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने अधिकृत वृत्त दिले आहे.
अरुण बाली यांनी ‘चाणक्य’, ‘स्वाभिमान’, ‘कुमकुम’ या टीव्ही सीरियल मध्ये केलेल्या भूमिका त्यावेळी गाजल्या होत्या. तर ‘3 इडियट्स’,‘केदारनाथ’,‘पानीपत’ ‘मनमर्जियां’, ‘पीके’ यासह तब्बल 40 चित्रपटात भूमिका त्यांनी साकरलेल्या होत्या.
अरुण बाली हे Myasthenia Gravis नावाच्या न्यूरोमस्कुलर दुर्मीळ आजाराने ते गेल्या अनेक दिवसांपासून पीडित होते. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,आज त्यांची प्राणज्योत मालवली.
Veteran actor Arun Bali passes away at the age of 79 years in Mumbai
— ANI (@ANI) October 7, 2022