नेलकरंजी-खरसुंडी मार्गावरील पुल वाहून गेला
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात गेली तीन दिवस झाले मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरु असून या पावसाने अनेक गावातील गाव ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. नेलकरंजी-खरसुंडी मार्गावर वाहणाऱ्या ओढ्याचा पुल वाहून गेल्याने खरसुंडी-नेलकरंजी वाहतूक बंद झाली आहे.
मागील महिन्यात आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली होती. परंतु त्यावेळी तालुक्यातील पश्चिम भागात पाऊस कमी प्रमाणात झाला होता.
परंतु गेली तीन दिवस झाले पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरु असून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. परिणामी या भागातून वाहणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गाव ओढ्यांना पाणी आले आले आहे.
नेलकरंजी-खरसुंडी मार्गावरून गाव ओढा वाहत असून या ओढ्याला अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरच पाणी या पुलावरून वाहत होते. परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचा पुल वाहून गेला आहे. त्यामुळे नेलकरंजी-खरसुंडी या मार्गावरची वाहतूक बंद असून सदरची वाहतूक ही पर्यायी मार्गाने सुरु आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस