माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राज्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला असून आता ९ जागांसाठी ९ उमेदवार राहणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून आज काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत, एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते. बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस एक उमेदवार मागे घेत असल्याचे सांगत महाविकास आघाडी पाचच उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.