Type Here to Get Search Results !

खानापूर विधानसभा मतदारसंघातून सात उमेदवारी अर्ज मागे ; अनिल बाबर, सदाशिव पाटील, श्रावण वाक्षे, आबा सागर यांच्यात चौरंगी लढत


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : खानापूर विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सात उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले असून अनिल बाबर, सदाशिव पाटील, श्रावण वाक्षे, आबा सागर यांच्यात चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
एकूण 18 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस होता. अर्ज माघारी घेण्यामध्ये  वैभव पाटील (अपक्ष), सुहास बाबर (शिवसेना), डॉ. उन्मेश देशमुख (बळीराजा शेतकरी संघटना),  सुभाष जगताप (अपक्ष), राजाराम देशमुख,भक्तराज ठिगळे, प्रकाश गायकवाड या सात जणांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता खानापूर विधानसभेसाठी विद्यमान आमदार, अनिलभाऊ बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, वंचित आघाडीचे श्रावणदादा वाक्षे व जनता दलाचे आबा सागर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies