माणदेश एक्स्प्रेस न्यूज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : कायमस्वरूपी दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या माण अशी ओळख असलेल्या तालुक्यात परतीच्या पावसाने काही भागात दमदार हजेरी लावल्याने दुष्काळी नदी म्हणून परिचित असलेली माण नदी दुथडी भरून वाहू लागल्याने माणदेशातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला आहे.
माण तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने माण नदी भरून वाहू लागली आहे. माणदेश म्हंटल कि डोळ्यासमोर उभा राहतो तो कायम दुष्काळी प्रदेश या प्रदेशातून त्या प्रदेशाला माण हे नाव पडले मात्र माण नावाचा प्रदेश कोठेच अस्तित्वात नाही. माण नदी ही सीताबाई डोंगरातून कुळकजाई येथून उगम पावून १८० किमीचा प्रवास करून ती पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे भिमा नदीस मिळते.
या नदीवर आटपाडी तालुक्यात राजेवाडी साठवण तलाव आहे. तालुक्यातील सर्वात मोठा साठवण तलाव म्हणून या तलावाकडे पहिले जाते. परंतु गेल्या ५ वर्षात पुरेशा पावसा अभावी तलाव पूर्ण क्षमतेने भरला नसल्याने या तलावावर अवलंबून असणारी शेती व येथील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर होता. परंतु परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने माण नदीचे पाणी राजेवाडी तलावात दाखल होणार आहे.