Type Here to Get Search Results !

“यांच्या घरात घुसून त्यांना मारावं लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे” : बच्चू कडू




 “यांच्या घरात घुसून त्यांना मारावं लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे” : बच्चू कडू 



अमरावती : सर्व देशभर शेतकर्यां च्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनमधून मदत मिळत आहे, असं बेताल वक्तव्य केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांबद्दल दानवे अशा पद्धतीनं बोलत असतील तर त्यांचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी हे तपासावे लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू  यांनी दिली आहे.




दानवे यांनी अजब विधान करत पाकिस्तान आणि चीनवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, 'जे आंदोलन सुरू आहे ते शेतकर्यां चे नाही. चीन आणि पाकिस्तानचा या आंदोलनामागे हात आहे. CAA आणि NRC वरून या पूर्वी मुस्लीम बांधवांना चिथवण्यात आलं मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले. NRC येत आहे 6 महिन्यात मुस्लिमांना देश सोडावा लागेल असं सांगण्यात आलं होतं मात्र NRC आणि CAA आल्यानंतर कुठल्या मुस्लीम बांधवांना देश सोडवा लागला असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला आहे.




बच्चू कडू यांनी सांगितलं की, आम्ही दानवे यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. आता दानवे यांच्या घरात घुसून त्यांना मारावं लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बच्चू कडू हे सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली मार्गावर आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज










टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
या बाबत मी स्वतंत्रपणे मित्रांशी शेअर केला आहे. वैशिष्ठ्ठय असं आहे की, विनोदाबरोबर ग्यानबाची मेख मारली आहे. तो स्वतंत्ररित्या सादर करीत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies