Type Here to Get Search Results !

“कसले अभिनंदन” आणि कसल्या मुलाखती!,” : भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

 



“कसले अभिनंदन” आणि कसल्या मुलाखती!,” : भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका 






मुंबई : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत टीका केली आहे. “शाळा, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, आरक्षण सगळ्याबाबतीत संभ्रम.. कापूस, धान खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही, याची हमी नाही. अहो, जिथे गणपतीची उंची, लोकल ट्रेनचा निर्णय सुद्धा होऊ शकत नाही. तिथे वर्षपूर्तीचे कसले “अभिनंदन” आणि कसल्या मुलाखती!,” असं म्हणत शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.






“परावलंबी वर्ष! तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केले. कोणतीही कणखर भूमिका नाही. ठोस निर्णय नाही. शेतकरी, कामगार, श्रमिक, बलुतेदार, छोटे उद्योग यांना कसलीही मदत केली नाही. खंबीर आधार नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवून रडगाणे गाणारे नेतृत्व दिसले!,” असं टीकास्त्र शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर डागलं आहे.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies