"मग त्यांचे नेते चंद्रकांत पाटील सहा वर्षे आमदार-मंत्री असताना झोपले होते का?" : हसन मुश्रीफ
मुंबई : महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड व शिक्षक उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ इंगळे सभागृहात मेळावा झाला, त्यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. भाजपचे उमेदवार पदवीधरांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याचे आता सांगत आहेत. मग त्यांचे नेते चंद्रकांत पाटील सहा वर्षे आमदार-मंत्री असताना झोपले होते का?’ असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमी असून, त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती संयमाने सांभाळली. मुंबईसह महाराष्ट्रात त्यांनी केलेल्या कामाचे जगाने कौतुक केले, पण मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करून भाजपने वैचारिक दिवाळखोरी दाखविली. मंदिरे उघडून लोक मरू देत आणि सरकार पडू दे, असा डाव त्यामागे होता.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज