Type Here to Get Search Results !

भीमा नदीचा पूर हा मानवनिर्मित ; जिल्हा प्रशासनावर कारवाई करावी : खासदार राजू शेट्टी


 भीमा नदीचा पूर हा मानवनिर्मित ; जिल्हा प्रशासनावर कारवाई करावी : खासदार राजू शेट्टी 

पंढरपूर : भीमा नदीला पूर आल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी खा. राजू शेट्टी पंढरपूरला आले होते. भीमा नदीचा पूर हा मानवनिर्मित असून नागरिकांच्या घराच्या व शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे़ याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.  


पुढे राजू शेट्टी म्हणाले, हवामान खात्याने दिलेल्या ईशाऱ्याकडे जिल्हा व आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. भीमा नदीला दुपारी ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते आणि रात्री अचानक लाखाचा विसर्ग सोडण्यात आला. नागरिक जीव जाण्याच्या भीतीने तत्काळ स्थलांतरित झाले म्हणून खूप मोठी जीवितहानी टळली. तरीही तेथील नागरिकांचे खूप झाले आहेत यामुळे जिल्हा प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले़


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies