Type Here to Get Search Results !

जल जीवन मिशन जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी



जल जीवन मिशन जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी  


सांगली :  सन 2009-10 पासून केंद्र शासनामार्फत सुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनमध्ये सामाविष्ट करुन पुनर्रचना करण्याचे  ठरविले आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तीक नळ जोडणीद्वारे प्रतिमाणसी किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापुर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख्य उद्यिष्ट आहे. त्यासाठी आवश्यक कृती आराखडा तात्काळ तयार करुन त्याची अंमलबजवणी प्रभावीपणे करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.  


जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन समितीची सभा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, कार्यकारी अभियंता तथा सदस्य सचिव जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समिती डी. जे. सोनावणे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.  




यावेळी जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी म्हणाले, शासनामार्फत सुरु करण्यात आलेली जल जीवन मिशन योजना सांगली जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, त्यासाठी लागणारे कामांचे अंदाजपत्रके प्रधान्यांने तयार करावेत व आराखडा वेळेत सादर करावा, शाळा व अंगणवाड्यांसाठीच्या पाणी योजना प्राधान्यांने कराव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies