बोंबेवाडीतील माण नदीवरील पुल पाण्याखाली ; स्मशानभूमी बुडाली
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातून वाहणाऱ्या माण नदी दुथडी भरून वाहत असून बोंबेवाडी येथील माण नदीवरील पुल सकाळपासून पाण्याखाली गेल्याने येथून होणारी वाहतूक बंद झाली आहे.
आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे माण नदीवर मोठा तलाव आहे. सदरचा तलाव गेली दोन वर्ष झाले सलग दुसऱ्या वर्षी भरला आहे. सदरचा तलाव पुणे क्षमतेने भरल्याने माण नदीचे पाणीगेली दोन महिने झाले सांडव्यावरून वाहत आहे. नदीवरील आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे, कौठूळी, पिंपरी खुर्द व बोंबेवाडी येथे वाहतुकीसाठी पुल बांधले असून हे सर्व पुल पाण्याखाली गेले आहेत.
यातील लिंगीवरे, पिंपरी खुर्द व कौठूळी येथील पुल हे लहान असल्याने लवकर पाण्याखाली जातात परंतु बोंबेवाडी येथे असणारा पुल हा मोठा असून उंच आहे. परंतु पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने या पुलावरून ही पाणी आल्याने सकाळपासून हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाच्या खालच्या बाजूला असणारी स्मशानभूमी या पुराच्या पाण्यात बुडली असून फक्त स्मशानभूमीचे पत्रे दिसत आहेत.
कायम दुष्काळी असा ठिपका असणारी माण नदी मात्र सलग दुसऱ्या वर्षी ही दुथडी भरून वाहत असून यामुळे नदी काठच्या शेतीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणीचे संपूर्ण शेतच वाहून गेले आहे. सलग दुसऱ्या वर्षी ही पावसाने कहर केल्याने शेतकरी मात्र मोठा आर्थिक संकटात सापडला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस