Type Here to Get Search Results !

पालघर हल्ला अफवेतून ; गृहमंत्री अनिल देशमुख ; सीआयडीच्या तपासातून निष्पण

अनिल देशमुख

पालघर हल्ला अफवेतून ; गृहमंत्री अनिल देशमुख ; सीआयडीच्या तपासातून निष्पण
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : तीन महिन्यांपूर्वी पालघरला झालेल्या हल्ल्यात २ साधू आणि १ ड्रायव्हर अशा तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तो हल्ला अफवेतून झाला असल्याचे सीआयडीच्या तपासामधून निष्पण झाले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीवट करून सांगितले.  
याबाबत याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले तीन महिन्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील गडचिंचोले येथे जमावाने अफवेतून २ साधू आणि १ ड्रायव्हर यांच्यावर हल्ला करून त्यांना मारण्यात आले होता. या सर्व प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला होता. त्यानुसार सीआयडीने कोर्टात चार्जशीट दाखल केली होतो. सदर घटना फक्त अफवेतून घडली असल्याचे सीआयडीच्या तपासातून निष्पन्न झाले. आहे. 
त्यावेळी अनेक राजकीय पक्षांनी या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता. पण सीआयडीच्या तपासातून ही घटना केवळ अफवेतून घडली असल्याचं स्पष्ट झालं आहे. सीआयडीने या प्रकरणात ८०८ लोकांची सखोल चौकशी करून १५४ जणांना अटक केली आहे. 
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies