Type Here to Get Search Results !

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला गांभीर्याने घेण्याची गरज : राजेंद्र खरात ; आटपाडी तालुक्यातील कोरोनाची वाढणारी संख्या चिंताग्रस्त


कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला गांभीर्याने घेण्याची गरज : राजेंद्र खरात ; आटपाडी तालुक्यातील कोरोनाची वाढणारी संख्या चिंताग्रस्त
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यासह आटपाडी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने कोरोना या संसर्गजन्य विषाणूला जनतेने गांभीर्याने घेण्याची गरज सल्याचे मत आटपाडी तालुका आरपीआयचे तालुकाध्यक्ष व फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना राजेंद्र खरात म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने देशासह राज्यात व जिल्हयामध्ये लॉकडाउन व संचारबंदी प्रमुख कारण म्हणजे कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्याने त्याची साखळी तोडणे. शासनाने दिलेल्या सूचना ह्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिल्या आहेत, त्यामुळे जनतेने या संचारबंदी व लॉकडाउनचे उल्लंघन करू नये. जनतेने आवश्यक असल्याच बाहेर पडावे अन्यथा घरीच बसून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies