काळेवाडी, तळेवाडी येथील नुकसानग्रस्त द्राक्षबागेचे पंचनामे करताना कृषी सहाय्यक राजेंद्र मेटकरी, सरपंच बाळू काळे, ग्रामसेवक धीरज मोरे व उपस्थित शेतकरी तर नुकसान झालेले द्राक्षाचे घड |
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले असून आटपाडी कृषी मंडल मधील काळेवाडी, तळेवाडी येथील द्राक्ष पिकाचे पंचनामे करण्यात आले.
परतीच्या पावसाने आटपाडी तालुक्यातील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आटपाडी कृषी मंडल मधील काळेवाडी, तळेवाडी येथील एकूण १७ हेक्टरमधील 34 शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे पंचनामे कृषी सहाय्यक राजेंद्र मेटकरी, सरपंच बाळू काळे, पोलीस पाटील मेटकरी, तळेवाडी चे ग्रामसेवक धीरज मोरे यांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी शेतकरी सिदा म्हारगुडे, अंकुश म्हारगुडे , संतोष म्हारगुडे , दादासो पाटील, गोविंद बोडरे, सिताराम सरगर, अंकुश मलमे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.