खानापूर : येथील देविखिंडी व करंजे येथे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना आम. अनिलभाऊ बाबर, उपस्थित अधिकारी व शेतकरी
|
माणदेश एक्सप्रेस न्युज
खानापूर/प्रतिनिधी : आम. अनिलभाऊ बाबर यांनी देविखिंडी व करंजे येथे नुकसानग्रस्त पिकांची व द्राक्ष बागांची पाहणी करून ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी खानापूर उपविभागीय अधिकारी शंकरराव बर्गे,
खानापूरचे तहसीलदार ऋषिकेश शेळके,
उपविभागीय कृषी अधिकारी
तांबे, तालुका कृषी अधिकारी
कुंभार, जिल्हा परिषद सदस्या सौ.निलमताई सकटे,
राजाभाऊ शिंदे, प्रकाशशेठ बागल,
भानुदास सूर्यवंशी, दादासाहेब पाटील, पोपट माने, दिलीप पाटील, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
परतीच्या पावसाने खानापूर तालुक्यात खूप मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे या भागाला कोकणाचे स्वरूप आले आहे. मोठ्या मेहनतीने पाण्याअभावी योग्य व्यवस्थापन करून जपलेली पिके काढणीच्या हंगामात पाण्याखाली गेली आहेत. शाळू, भुईमुगाचे नुकसान झाले आहे. लोक पाण्यातून ही पिके काढताना दिसत आहेत. परंतु त्याची नासाडी झाली आहे. द्राक्ष बागायतदारांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी करंजे व देविखिंडी येथे भेट देऊन केली. यावेळी उपस्थित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.