माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/सचिन कारंडे : आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा दि. १२ पासून कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपासून ते 21 नोव्हेंबर पर्यंत भरणार आहे. यात्रेनिमित्त ग्रामपंचायत मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे उत्तरेश्वर यात्रे मध्ये मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्याचा बाजाराची उलाढाल होत असते. हॉटेल, पाळणे, लहान स्टेशनरी स्टॉल, चहा गाडा, हातगाडा यांनी यात्रेमध्ये दुकाने सजली आहेत.
मंगळवार दि. १२ कार्तिक पोर्णिमापासून यात्रेस प्रारंभ होतो. यादिवशी पूजा व आरती करून कलेश्वर ते उत्तरेश्वर पालखी नेण्याचा मान राऊत यांचा असतो. रोज सकाळ, सायंकाळी नित्यनेमाने आरती व पूजा करण्याचा मान बाबुराव बाळकृष्ण गुरव यांच्याकडे आहे.
दि. २१ रोजी रथोत्सव शेवट दिवस असून त्यादिवशी सायंकाळी ४.०० वाजता रथ मिरवणुकीस प्रारंभ होतो व नैवेद्याचा कार्यक्रम त्याच दिवशी असतो. मानकरी राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात येते. नंतर रथ ओढण्यास प्रारंभ होतो. रथ ओढण्याचा मान माळी समाजाला असून माळी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. रथ यात्रेमधून एसटी स्टँड मार्गे, मेन पेठेतून ढोल, ताशाच्या आवाजात फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक निघते. सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने रथाचे स्वागत करतात. मानकरी राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या वाड्यासमोर नंतर येतो. पूजा व आरती करण्यात येते. नंतर रथ उत्तरेश्वर मंदिराकडे मार्गस्थ होतो अशी माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली असून सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने यात्रेमध्ये उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. मानपानाचा कार्यक्रम सायंकाळी रात्री आठ वाजता उत्तरेश्वर मंदिर येथे सर्व मानकऱ्यांचा मानपान करण्यात येतो.
दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी click करा.