माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची आचारसंहिता 21 सप्टेंबर 2019 पासून लागू झाली आहे. सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी याकरिता जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट, परमिट रूम, बार व देशी / विदेशी दुकाने अशा ठिकाणी रात्री 22.00 वाजल्यानंतर ग्राहकांना प्रवेश देण्यास बंदी, खाद्यपदार्थ व मद्य विक्री करण्यास आणि सदरची आस्थापना रात्री 22.30 वाजल्यानंतर सुरू ठेवण्यास बंदी घातली आहे.
हा आदेश दिनांक 23 सप्टेंबर 2019 रोजी पासून ते दिनांक 27 ऑक्टोबर 2019 रोजी पर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / मंडळाचे पदाधिकारी यांच्या विरूध्द पोलीस विभागाकडून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.