Type Here to Get Search Results !

वारणा धरणात 34.30 टी.एम.सी. तर कोयना धरणामध्ये 105.15 टी.एम.सी पाणीसाठा

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.30 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. दिनांक 24 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 105.15 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 13.45 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.99 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 25.18 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी  धरणात 8.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असून हे धरण 100 टक्के भरले आहे, असे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
  सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 21 हजार 30 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 16 हजार 824 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 8 फूट 6 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 10 फूट 6 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies