आटपाडी नगरपालिकेसाठी दहाव्या दिवशीही धरणे सुरु
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/सचिन कारंडे : तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने भारततात्या पाटील आणि आनंदरावबापू पाटील यांचे नेतृत्वाखाली आटपाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेत करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा आजचा दहावा दिवस होता. परंतु अद्यापही शासनाला जाग आलेली नाही. जोपर्यंत आमच्या हातात आदेश येत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम मागणी आंदोलकांनी यावेळी मांडली. आंदोलकांनी लक्ष वेधून घेण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन केले. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
बोंबाबोंब आंदोलन करीत स्वाभिमान विकास आघाडीच्या आंदोलकांनी आटपाडी शहराला न्याय द्यावा व तातडीने नगरपालिका करावी असा इशाराही देण्यात आला. स्वाभिमानी विकास आघाडीच्या वाढत्या पाठींब्याने नगरपालिका होणारच, अशी उत्सुकता नागरिकांमध्ये जोर धरत आहे. आता नगरपालिकाच व्हावी अशी चर्चाही सुरू आहे. आंदोलनास दहा दिवस होऊनही शासनाकडून निर्णयास विलंब होत असून, प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारततात्या पाटील व आनंदरावबापू पाटील यावेळी दिला.
या आंदोलनास राष्ट्रीय समाज पक्षाचे उमाजी चव्हाण यांनी जाहीर पाठिंबा दिला. भारिप बहुजन महासंघ तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे व वंचित आघाडीचे नेते विनायकराव मासाळ यांनीही जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी भारततात्या पाटील, आनंदरावबापू पाटील, राजेंद्र चव्हाण, मुरलीधर पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब सागर, बाळासाहेब पाटील, जितेंद्र जाधव, जाकिर मुलाणी,आप्पासो पाटील, रवींद्र लांडगे, संतोष डोंबे, बाबुराव पाटील, किरण मिसाळ, दिलीप पाटील, हणमंत कदम, धनाजी लेंगरे हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.