Type Here to Get Search Results !

माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहीजे... सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात



माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहीजे... सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात




मुंबईः अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने राज्य सरकारवर टीका केली जात आहे. तसेच, पूरग्रस्त व अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावरून युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

 


माणूस सत्तेवर असताना जमिनीवर पाहिजे, सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर निघाले असताना थेट बांधावरूनच या दोघांत वाकयुद्ध रंगले. मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दांत फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांनी पलटवार केला आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies