पीएम किसान च्या लाभापासून अजनाळे येथील शेतकरी वंचित ; प्रतिवर्षी मिळणार होते सहा हजार रुपये...
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना शेतकऱ्यांची मान उंचावण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान किसान मानधन योजना १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू करण्यासाठी आली आहे. अजनाळे गावातील ८१७ शेतकऱ्यांना तर लिगाडेवाडी येथील ३८९ शेतकऱ्यांना असा एकूण १२०६ शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे उर्वरित शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना याचा कधी लाभ मिळणार? असा संतप्त सवाल येथील शेतकरी विचारत आहेत.
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची व्यवस्था केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने केली आहे. अजनाळे व लिगाडेवाडी येथील शेतकरी या पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहिलेले असून शेतकऱ्यांनी अनेक वेळा गाव कामगार तलाठी कार्यालय कडे हेलपाटे मारून सुद्धा या योजनेचा पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघू लागला आहे. गावातील जवळपास २० टक्के शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचा लाभ मिळावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करत असताना दुसरीकडे मात्र गाव कामगार तलाठी व कोतवाल यांच्या निष्काळजीपणामुळे अजनाळे व लिगाडेवाडी गावातील शेतकऱ्यांना या योजनेपासून दूर राहावे लागत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
गाव कामगार तलाठी कार्यालय मध्ये आधार कार्ड, बँक पासबुक चार वेळा देऊन ही अद्यापर्यंत मला पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला नाही. वेळोवेळी तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता जमा होतील असे सांगून परत पाठवले जाते. तरी मला या योजनेचा लाभ मिळावा.Join Free WhatassApp माणदेश एक्सप्रेस
दत्तात्रय सुखदेव भंडगे
शेतकरी अजनाळे