Type Here to Get Search Results !

बंधाऱ्यात पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; माण तालुक्यातील घटना



बंधाऱ्यात पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; माण तालुक्यातील घटना 

माणदेश एक्सप्रेस टीम


म्हसवड/अहमद मुल्ला :  सलग दोन दिवस पडलेल्या परतीच्या  पाऊसाने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील विहिरी वरील विद्युत मोटार काढण्यासाठी गेलेले देवापुर ता. माण येथील शेतकरी सुनिल सोपान बाबर वय ५४ यांचा बंधाऱ्यावरुन विहिरी कडे जाताना पाय घसरून पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने माण तालुक्यात पाऊसामुळे शेतकऱ्याचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.




याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, देवापुर ता.माण येथील शेतकरी सुनिल सोपान बाबर वय ५४ हे आज 11:30 च्या सुमारास शेतातील विहिरी वरील विद्युत मोटार काढण्यासाठी चालले असताना  बंधाऱ्यावरुन जात असताना पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. अगोदरच दोन दिवस परतीचा पाऊस जोरदार पडत असल्याने ओढे तुडूंब भरून वहात आहेत. त्यात ओढ्यावर बंधारा असून त्या बंधाऱ्यात ते पडले व बंधाऱ्यातील पाण्यात भोहरा तयार झाल्याने त्या भोवऱ्यात अडकल्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येणे अशक्य झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याने माण तालुक्यात पाऊसामुळे शेतकऱ्याचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.  या घटनेचा तपास सब इन्सपेक्टर रविद्र डोईफोडे करत आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies