राज्यातील शाळा सुरु ह्या नंतर होणार सुरु
मुंबई : राज्यातील शाळा वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे 15 ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शालेय शिक्षण विभागाला दिले.
केंद्राची नवीन नियमावली आली असून यामध्ये सर्व शाळा ह्या १५ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु ज्या-त्या राज्यांना शाळा सुरु करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यामुळे आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शाळा ह्या दिवाळी नंतर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस