भाजप आमदाराने केला महाविकास आघाडी सरकारचा ‘निर्लज्ज‘ उल्लेख
मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे 71 हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने घेतल्याच्या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, अशी टीका करत यासंदर्भात टिवट केले आहे.
भातखळकर यांनी आपल्या टिवटमध्ये हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही 71 हजार रुपयांचे बिल फाडले “निर्लज्ज सरकार” असे म्हटले आहे. यावर्षी कोरोनामुळे पायी आषाढी वारीवर सरकारने निर्बंध घातल्यामुळे राज्यभरातील प्रमुख पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी सरकारकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल, असे सुरूवातीला सांगण्यात आले होते.
दरम्यान, संस्थानच्या विश्वस्तांचा सरकार विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देणार, असा समज झाला होता परंतु शासनाकडून कसलाही आदेश न झाल्याने संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचे 71 हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली