Type Here to Get Search Results !

Good News I राज्यात रेल्वेने येणाऱ्या मजुरांच्या तिकिटाचे पैसे राज्य सरकार भरणार


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम
आटपाडी : संपूर्ण देशात व राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलेले आहेत. परिणामी अनेक देशात अनेक भागात वेगवेगळ्या राज्यात अनेक मजूर अडकून पडलेले आहेत. त्या-त्या राज्यातील मजुरांना आपापल्या राज्यात पोहच करण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला असून श्रमिक रेल्वे सुरु झाली आहे.

परंतु गेली दीड महिना झाले लॉकडाऊन असल्याने मजुरांकडील असलेले जीवनावश्यक साहित्य व पैसे संपुष्टात आले आहेत. परिणामी राज्यातील अनेक मजूर देशाच्या वेगवेगळ्या भागात अडकून पडले असून त्यांना राज्यात येण्यासाठी पैसे नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला असून देशाच्या इतर भागात अडकून पडलेल्या राज्यात परत येणाऱ्या मजुरांचे रेल्वेच्या तिकिटाचे पैसे मुख्यमंत्री सहायत्ता निधीतुन भरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यात येणाऱ्या परंतु पैसे नसल्याने अडकून पडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु सदरची मुदत ही १७ मे पर्यंत असणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies