माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम
आटपाडी : संपूर्ण देशात व राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलेले आहेत. परिणामी अनेक देशात अनेक भागात वेगवेगळ्या राज्यात अनेक मजूर अडकून पडलेले आहेत. त्या-त्या राज्यातील मजुरांना आपापल्या राज्यात पोहच करण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला असून श्रमिक रेल्वे सुरु झाली आहे.
परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 10, 2020
परंतु गेली दीड महिना झाले लॉकडाऊन असल्याने मजुरांकडील असलेले जीवनावश्यक साहित्य व पैसे संपुष्टात आले आहेत. परिणामी राज्यातील अनेक मजूर देशाच्या वेगवेगळ्या भागात अडकून पडले असून त्यांना राज्यात येण्यासाठी पैसे नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला असून देशाच्या इतर भागात अडकून पडलेल्या राज्यात परत येणाऱ्या मजुरांचे रेल्वेच्या तिकिटाचे पैसे मुख्यमंत्री सहायत्ता निधीतुन भरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यात येणाऱ्या परंतु पैसे नसल्याने अडकून पडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु सदरची मुदत ही १७ मे पर्यंत असणार आहे.