माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : सध्या संपूर्ण देशात व राज्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मोल मजुरी करून आपले जीवन जगणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे पैलवान ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आटपाडी तालुक्यातील विठ्ठलनगर येथे जीवनावश्यक वस्तूंचे घरोघरी जावून वाटप करत माणुसकी जपली.
पैलवान ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आटपाडी तालुक्यातील विठ्ठलनगर येथे जीवनावश्यक वस्तूंचे घरोघरी जावून वाटप करत माणुसकी जपली. pic.twitter.com/H4EOaNSO9p— दैनिक माणदेश एक्सप्रेस (@DainikMandesh) May 9, 2020
विठ्ठलनगर परीसरामध्ये मोल मजुरी व हातावरचे पोट असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या भागात पैलवान ग्रुपचे संस्थापक मारुती जाधव, अजित जाधव व सहकारी यांनी कै.सौ. वासंती बाळासाहेब सापळे सोशल फौंडेशन व कै. संतोष उर्फ भैय्या सापळे सामाजिक संस्था पनोरी ता. राधानगरी, जि. कोल्हापूर यांच्या वतीने विठ्ठलनगर परिसरात असणाऱ्या सर्व नागरिकांना घरोघरी जावून जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली पाटील, वरदान उद्योग समुहाचे ॲड. धनंजय पाटील यांच्या हस्ते वाटपाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पैलवान ग्रुपचे संस्थापक मारुती जाधव, दत्तात्रय जाधव, अजित जाधव, अनिल जाधव, दत्तात्रय माने, लक्ष्मण जाधव, तुकाराम जाधव, सुनील जाधव आदी उपस्थित होते.