माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम
आटपाडी : राज्य शासनाने “या” वृत्तवाहिनीवर कायदेशीर कार्यवाही करावी कार्यवाही करण्यासाठी केंद्र सरकारला विंनती करावी आणि या वाहिनीवर किमान १ महिन्याची बंदी घालण्यात यावी. अशी मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी twitter द्वारे केली आहे.
राज्य शासनाने, या वृत्तवाहिनीवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी केंद्र सरकारला विंनती करावी आणि या वाहिनीवर किमान १ महिन्याची बंदी घालण्यात यावी. भविष्यात कोरोनाबद्दलचे कोणतेही रिपोर्टींग करताना ICMR किंवा केंद्राची परवानगी घेणे वृत्तवाहिन्यांना बंधनकारक करावे. (२/२)— Prithviraj Chavan (@prithvrj) May 17, 2020
एका राष्ट्रीय हिंदी वृत्त-वाहिनीने खोडसाळपणे टोमॅटो ला कोरोना शी जोडल्यामुळे राज्यातील टोमॅटो पिकाचे दर कोसळले आहेत व शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अशा बेजबाबदार पत्रकारीतेवर कार्यवाही केलीच पाहीजे. आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहीजे.
एका राष्ट्रीय हिंदी वृत्त-वाहिनीने खोडसाळपणे #टोमॅटो ला #कोरोना शी जोडल्यामुळे राज्यातील टोमॅटो पिकाचे दर कोसळले आहेत व शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अशा बेजबाबदार पत्रकारीतेवर कार्यवाही केलीच पाहीजे. आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहीजे. (१/२) pic.twitter.com/Q0ozKj0uUC— Prithviraj Chavan (@prithvrj) May 17, 2020
तसेच भविष्यात कोरोनाबद्दलचे कोणतेही रिपोर्टींग करताना ICMR किंवा केंद्राची परवानगी घेणे वृत्तवाहिन्यांना बंधनकारक करावे. अशी ही मागणी त्यांनी केली आहे.