Type Here to Get Search Results !

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात सरकार अपयशी : डॉ. रामदास आठवले


कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात सरकार अपयशी : डॉ. रामदास आठवले 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : कोरोना वाढता प्रभाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकार वर केली आहे.

केंद्र सरकारने कोरोना या महामारीच्या आपत्तीसाठी २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु राज्य सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. गेली २ महिने झाले लॉकडाऊन असल्याने अनेक गरिबांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे. परंतु राज्य सरकारने याकडे डोळेझाक केली असून अजून पर्यत मदतीचे पॅकेज जाहीर करायला पाहिजे होते ते त्यांनी केले नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र राज्य सरकार ढिसाळ कारभारामुळे अपयशी ठरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies