कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात सरकार अपयशी : डॉ. रामदास आठवले
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : कोरोना वाढता प्रभाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकार वर केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र राज्य सरकार ढिसाळ कारभारामुळे अपयशी ठरले आहे. केंद्राने जसे 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले तसे महाविकास आघाडी सरकार नेमदतीचे पॅकेज जाहीर करायला पाहिजे होते. लॉक डाऊन ला 2 महिने होत आले या काळात राज्य सरकार नाकर्ते ठरले आहे. pic.twitter.com/1PMXN3Zcw0— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) May 23, 2020
केंद्र सरकारने कोरोना या महामारीच्या आपत्तीसाठी २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु राज्य सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. गेली २ महिने झाले लॉकडाऊन असल्याने अनेक गरिबांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे. परंतु राज्य सरकारने याकडे डोळेझाक केली असून अजून पर्यत मदतीचे पॅकेज जाहीर करायला पाहिजे होते ते त्यांनी केले नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र राज्य सरकार ढिसाळ कारभारामुळे अपयशी ठरले आहे.