मुंबई : शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवणा असल्याचे प्रतिपादन प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केले. शिवसनेला पाठिबा देण्यासाठी ते राजभवन येथे आले असता त्यांनी पत्रकारांना सांगितले.
यावेळी बोलताना आम. बच्चू कडू म्हणाले, आम्हाला काही नको, शेतकरी मजुरांसाठी आम्ही शिवसेनेसोबत आहोत. यावेळी त्यांनी अपक्ष आमदार राजकुमार पटेल, राजेंद्र पाटील आपल्यासोबत असल्याचे सांगितले.
शिवसेनेचे सरकार स्थापन झाले तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. तसेच शपथविधीबाबत अद्याप आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.