माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार समितीच्या इमारतीमध्ये शेतकरी, व्यापारी, अडते यांच्यासाठी ई-नाम चे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
केंद्रशानाचे ई-नाम योजने अंतर्गत (राष्ट्रीय कृषि बाजार) आटपाडी बाजार समितीचा समावेश जाहला आहे. या योजने अंतर्गत शेतमालास योग्य भाव, शेतमालाचे वर्गीकरण (ग्रेडींग), योग्य हाताळणी, मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे पैसे तात्काळ शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच या योजनअंतर्गत समितीमध्ये इतर राज्यातील नोंद असणारे अडते, खरेदीदर बोली लावू शकतील व स्पर्धा निर्माण होवून चांगला दर मिळणार आहे. भविष्यात अशा शेतीमालास राष्ट्रीय स्तरावर देखील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.तसेच योजनेअंतर्गत नोदणीकृत खरेदीदारांचे बँक खात्याची माहिती घेवूनच त्यांना बोली लावता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रक्कमांबाबत सुरक्षितता निर्माण होणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड झेरॉक्स प्रत, बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, मोबाईल क्रमांक
या योजनेची सर्व शेतकरी, अडते, व्यापारी बंधूना माहिती व्हावी यासाठी बाजार समितीचे इमारतीमध्ये रविवार दि. २४/११/२०१९ रोजी दुपारी १२:०० वाजता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. केंद्रशासन नियुक्त प्रशिक्षकामार्फत ई-नाम योजनेचे कामकाज, उद्देश, फायदे व वैशिष्ट्ये याबाबत विस्तृत माहिती दिली जाणार आहे.
तरी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीमार्फत करणेत आले आहे.