Type Here to Get Search Results !

छोडेन लेपचा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘वन’ इंडिया पुरस्कार’ प्रदान





माणदेश एक्सप्रेस न्युज 
मुंबई :  ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी ‘माय होम इंडिया’ ही संस्था एक सेतू म्हणून कार्य करत आहे, असे गौरवोद्‌गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सिक्कीम येथील  सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या छोडेन लेपचा यांना ‘माय होम इं‍डिया’ या संस्थेचा ‘वन’ इंडिया पुरस्कार’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, श्रीमती लेपचा कठोर परिश्रमातून समाजाच्या विकासासाठी विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत आहेत. अनाथ मुलांसाठीसुद्धा त्यांचे मोठे कार्य असून हे राष्ट्रीय  कार्य अभिनंदनीय असल्याचेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डी.वाय.पाटील, सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनिल देवधर, राहूल राठी, केंद्रीय विद्यापीठ (बिलासपूर) कुलगुरु अंजली गुप्ता आदी उपस्थित होते.

दैनिक मानादेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies