माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/वार्ताहर : खरसुंडी ता. आटपाडी, जि. सांगली येथील क्रांतीसुर्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालदिना निमित्त सर्व अंगणवाडीतील बालकांना खाऊ वाटप करण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांना यांच्या जन्मदिनी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी आपल्याकडे हा दिवस बालदिन म्ह्णून साजरा केला जातो. नेहरूंना सुरुवातीपासूनच लहान मुलांच्या प्रति विशेष जिव्हाळा होता. ही बाब लक्षात घेता त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना आदरांजली देण्याच्या हेतूने भारत सरकार कडून हा दिवस बाल दिन म्ह्णून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधत संस्थेच्या वतीने यावेळी लहान बालकांना पंचायत समिती सदस्या सौ. सारिका भिसे, मदन जावीर, विक्रम भिसे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सदानंद कांबळे, दत्ता केंगार, राजेंद्र केंगार, बापुराव ऐवळे तसेच अंगणवाडीतील शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या.