नेहमीच कर्मचारी व अधिकारी यांच्यामुळे वादग्रस्त बनलेले आटपाडीतील भूमिअभिलेख कार्यालय |
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा दिघंची चे सरपंच अमोल मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत लेखी निवेदन त्यांनी तहसीलदार आटपाडी यांना दिले आहे.
अमोल मोरे |
आटपाडी भूमी अभिलेखच्या अधिकारी लता घरत या महिन्यातील अनेक दिवस गैरहजर असतात. तसेच येथील कर्मचारी हे नागरिकांना मुजोर उत्तरे देतात. सर्वसामान्य नागरिकांना कोठेही जाऊन तक्रार करा आम्हाला काही फरक पडत नाही अशी उत्तरे देतात. त्यामुळे नागरिकांची प्रचंड मोठी नाराजी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या बद्दल आहे.
सदर भूमी अभिलेख विभागात मोठा भ्रष्टाचार होत असून त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सरपंच अमोल मोरे यांनी केली आहे. तसेच तात्काळ यांच्यावर कारवाई झाली नाही तर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच अमोल मोरे यांनी दिल आहे.
सदर कर्मचारी व अधिकारी हे गेंड्याच्या कातडीप्रमाणे वागत असून तालुक्यातील लोकांचे हाल होत आहेत त्यामुळे सदर अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.