माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी : खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये आटपाडीचा सर्वपक्षीय उमेदवार असावा यासाठी आज शनिवार दि. 5 रोजी सायं. ६.०० बैठक आयोजित केली असून या बैठकीस तालुक्यातील सर्व नागरिकांनी व नेत्यांनी उपस्थित राहणायचे आवाहन राजाराम देशमुख यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आटपाडी तालुक्याचाच आमदार झाला पाहिजे अशी भूमिका घेतली होती व त्याबाबत दि. ३ रोजी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व आटपाडी तालुक्यातील नागरीकांची बैठक संपन्न झाली. परंतु या बैठकीत कोणाचीही उमेदवारी अंतिम झाली नाही, तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आटपाडी तालुक्यातील राजाराम देशमुख, आबा सागर, श्रावण वाक्षे, अॅड. सचिन सातपुते, प्रकाश गायकवाड, संतोष हेगडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तरी तालुक्यातील नागरिकांनी व तालुक्यातील नेत्यांनी आज होणाऱ्या सर्वपक्षीय उमेदवारासाठी आटपाडी येथील जवळे हॉल येथे आज शनिवार दि.५ रोजी सायंकाळी ६.०० उपस्थित राहण्याचे राहण्याचे आवाहन राजाराम देशमुख यांनी केले आहे.