माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/ वार्ताहर : विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी विकास आघाडी गटाची बैठक व कार्यकर्ता मेळावा आज रविवार दिनांक 13 रोजी सायंकाळी पाच वाजता सावित्रीदेवी कॉटन मिल येथे स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारततात्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केला असल्याची माहिती भारततात्या पाटील यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी विकास आघाडी गट कोणती भूमिका घेणार आहे किंवा कोणती भूमिका घ्यायची आहे याबाबतीत सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. गटाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते तसेच सर्व नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. सर्वांची मते जाणून नंतर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. स्वाभिमानी विकास आघाडी कोणती भूमिका घेणार याकडे निवडणुकीत उतरलेल्या सर्व उमेदवारांचे लक्ष असणार आहे.
खानापूर मतदार संघामध्ये प्रमुख लढत ही अनिल भाऊ बाबर शिवसेना व अपक्ष उमेदवार सदाशिव पाटील यांच्यात प्रमुख होणार आहे. तसेच वंचित आघाडी चे उमेदवार श्रावणदादा वाक्षे व जनता दला कडून आबा सागर हेही निवडणुकीत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे कुठल्या नेत्याला स्वाभिमानी विकास आघाडीची गटाचे पाठबळ मिळेल यावर बऱ्याचकाही राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारततात्या पाटील यांनी केले आहे.