माणदेश एक्स्प्रेस न्यूज
दिघंची : दिघंची ता.आटपाडी, जि.सांगली येथील महाविद्यालयीन युवक वैभव विष्णू जावीर व.व. २० याने नवीन बांधलेल्या आपल्या घरात स्वयंपाक खोलीत स्लॅप मधील लोखंडी हुकाला दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल दि. १९ रोजी दिघंची येथील यमाई नगर येथे सकाळी ११ वाजता घडली. याबाबत दत्तात्रय निवृत्ती जावीर यांनी आटपाडी पोलिसांनी ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घरात किरकोळ गोष्टीवरून रागावून जाऊन वैभव जावीर याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे तो आटपाडी महाविद्यालयात डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकत होता.
तर नेलकरंजी येथील शंकर बुधआप्पा भोसले व.व. ५२ याने लिंबाच्या झाडास काल दि. १८ रोजी सकाळी ७.४५ मिनिटांनी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत सदरची फिर्याद पोलीस पाटील जगन्नाथ दगडू जावीर यांनी आटपाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.