माणदेश
एक्सप्रेस न्यूज
सांगली, दि. 22, (जि. मा.
का.) : भारत निवडणूक
आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019
चा कार्यक्रम जाहीर
केला असून आदर्श
आचार संहिता दिनांक 21 सप्टेंबर 2019 पासून
लागू झाली आहे.
निवडणूक काळात केबल टी.व्ही. वरून निवडणुकीच्या
संदर्भात जाहिरात / उमेदवाराचा अथवा
राजकीय पक्षाचा प्रचार केला
जातो. सदर केबल
दूरचित्रवाणी वरून करण्यात
येणाऱ्या जाहिराती / प्रचार यासाठी
लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम
127 मधील तरतुदीनुसार परवानगी घेणे
आवश्यक आहे, असे
आवाहन जिल्हाधिकारी तथा
जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत
चौधरी यांनी केले
आहे.
जिल्हाधिकारी
डॉ. अभिजीत चौधरी
म्हणाले, केबल टेलीव्हीजन
ॲक्ट 1955 मधील तरतुदीनुसार
कोणतेही प्रसारण करण्यापूर्वी संबंधित
प्राधिकारण यांची मान्यता घेणे
आवश्यक आहे. सर्वोच्च
न्यायालयाकडील स्पेशल केस क्र.
6679/04 दिनांक 23 एप्रिल 2004 मध्ये दिलेल्या
मार्गदर्शक सूचनेप्रमाणे व निवडणूक
आयोग नवी दिल्ली
यांच्याकडील आदेश क्र.
509/75/2004/जेएस-1 दि. 15 एप्रिल 2004 मधील
सूचनेप्रमाणे निवडणुकीच्या संदर्भात दूरचित्रवाणीवरून कोणत्याही
प्रकारचे प्रसारण करण्यापूर्वी संबंधित
प्राधिकरणाची मान्यता घेण्यात यावी.
यामध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन
झाल्यास अथवा मान्यता
न घेता जाहिराती
/ प्रचार केल्याचे निदर्शनास आल्यास
आदर्श आचार संहितेमधील
मागदर्शक सूचनेप्रमाणे व कायद्यातील
तरतुदीनुसार कारवाई केली जाईल,
असे जिल्हादंडाधिकारी डॉ.
अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट
केले आहे.