माणदेश एक्सप्रेस न्यूज
भिवघाट : खानापूर तालुक्यातील करंजे येथील अग्रणी नदीवर मोठ्या पुलाचे काम गेल्या काही दिवसासापासून सुरू असून याठिकाणी वाहतुकीसाठी पर्यायी पूल तयार करण्यात आला होता परंतु सदर रस्त्यालावरून पाणी जाण्यासाठी पाईप टाकल्या गेल्या नसल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो रपाण्याचा व रस्त्याचा अंदाज न आल्याने पटली झाल्याने लाखो रुपयांची नुकसान झाले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, आज गुरुवार रोजी सकाळी चाकण येथील बॉश कंपनीच्या गोडाऊन मधून वॉशिंग मशीन व इतर उपकरणे घेवून आयशर टेम्पो हा आटपाडी येथील दुकानादारांना पोहच करून तो सांगलीकडे निघाला होता. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने व टेंभू योजनेच्या सोडलेल्या पाण्याने अग्रणी नदीला पाणी आले आहे. त्यातच करंजे येथील असलेला जुना पुल संबंधित ठेकेदाराने पाडून त्या ठिकाणी दुसरा नवीन पूल उभा करण्याचे काम चालू आहे. परंतु सदर पुलाला पर्यायी पुला तयार करणे गरजेचे असताना ठेकेदाराने तात्पुरता रस्ता चालू केला होता परंतु त्या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी पाईप वापरल्या नाहीत. परिणामी पाण्याने सदरचा रस्ता खचला गेला होता. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये टेम्पो चालकाला स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले परंतु इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पाण्यात भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.