माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : कै. रामभाऊ पाटील विकास सोसा. संचलित आटपाडी तालुक्यातील यपावाडी येथील चारा छावणीमध्ये माडगुळे येथील शेतकरी मधुकर विभूते यांनी गौराईची (महालक्ष्मी) स्थापना केली. याप्रसंगी सदर गौराई पाहण्यासाठी स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारततात्या पाटील यांनी चारा छावणीस भेट देवून गौराई (महालक्ष्मी) चे दर्शन घेतले. यावेळी मधुकर विभूते व चारा छावणीतील शेतकऱ्यांच्या कडून शालेय विद्यार्थी व चारा छावणीतील शेतकऱ्यांना भोजनदान देण्यात आले.
याप्रसंगी भारततात्या पाटील, दै. माणदेश एक्सप्रेसचे संपादक दिपक प्रक्षाळे, दै.तरूण भारतचे तालुका प्रतिनिधी सुरज मुल्ला, दै. पुढारीचे तालुका प्रतिनिधी प्रशांत भंडारे, ग.दि. माडगुळकर विद्यालयाचे प्राचार्य बी.ए. पाटील सुरेश चव्हाण, प्रा. हेमंत कुलकर्णी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेतकरी मधुकर विभूते म्हणाले, आटपाडी तालुक्यात कायमस्वरूपी दुष्काळी स्थिती असल्याने जनावरांची उपसामार होणार होत; परंतु भारततात्या पाटील यांनी यपावाडी परिसरामध्ये चारा छावणी सुरु करून येथील शेतकऱ्यांच्यावर उपकार केले आहेत. परंतु शासनाने मात्र अजूनही चाराछावणीचे बिले अद्यापही दिली नाहीत. तालुक्यातील बऱ्याच गावातील चारा छावणीवाले पळून गेले, काहींनी बंद केली. परंतु तात्यांनी चारा छावणी बंद होवू दिली नाही. तर यावेळी एका शेतकऱ्याने तात्या आमच्यासाठी देव असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक करताना सुरेश चव्हाण म्हणाले, शासनाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची थट्टा केली असून सांगली जिल्ह्यात पूर आलेल्या गावाला माणसी १० ह्जारू रुपये घोषित केले. परंतु पिढ्यानपिढ्या दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जनावराला प्रति जनावर १०० रुपये म्हणजे आमच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे. त्यामुळे शासनाने चारा चावण्या जो पर्यंत तालुक्यात पाऊस होत नाही तो पर्यंत बंद करू नका असे म्हणाले.