Type Here to Get Search Results !

पालकांनी मुलांना खेळाडू बनण्यास प्रवृत्त करावे : अमरसिंह देशमुख

माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/वार्ताहर : स्पर्धेच्या युगात शिक्षणासह खेळात नैपुण्य मिळवण्याची गरज आहे. मुलांना मोबाईलपासून लांब ठेवून त्याच्या मनात कोणत्याही खेळाची आवड निर्माण करणे काळाजी गरज बनत चालल्याची प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी व्यक्त केली. ते आटपाडी नाभिक समाज मंदिर  येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सायकलपटू समर्थ प्रमोद क्षीरसागर या पाच वर्षांच्या मुलाने शेटफळे ते आटपाडीचे 12 किलोमीटर अंतर केवळ एक तासात पूर्ण केले होते. त्याचा सत्कार अमरसिंह  देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अमरसिंह देशमुख यांनी आटपाडीतील नाभिक समाज मंदिर येथील पेव्हिंग ब्लॉक कामाची पाहणी केली.
अमरसिंह देशमुख म्हणाले की, पालकांनी मुलाच्या भविष्याचा विचार करावा. मुलांना मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी, त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी पालकांनी लक्ष देण्याचे आवाहन केले. समर्थ भविष्यात यशस्वी खेळाडू होईल अशी आशा व्यक्त करून त्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, ऋषिकेश देशमुख,दिनेश देशमुख, आटपाडी तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण क्षीरसागर,अरुण साळुंखे, संभाजी देशमुख, जालिंदर खंडागळे,अनिल गवळी,महादेव गवळी,दिनकर चव्हाण,अरुण राऊत,खंडू काशीद,प्रवीण सूर्यवंशी, विजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies