आघाडी “वंचितचं”
स्वबळावर लढणार बहुजन वंचित आघाडी: ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका: राज्यातील ४८ जगावर उभे करणार उमेदवार
माणदेश एक्सप्रेस न्यूज
मुंबई: होणार; नाही होणार; आघाडी होणार, या बातम्यांना आता पूर्णविराम मिळाला असून वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या महाराष्ट्रतील संपूर्ण 48 जागा लढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात बराच मोठा फेरबदल करणारे वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण राजकीय पक्षांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर आघाडी करण्यास इच्छुक असतानाही फक्त एमआयएमची साथ सोडा आम्ही आघाडी करण्यास तयार आहोत असे काँग्रेसकडून वारंवार उत्तर मिळत असतानाही, तुम्ही राष्ट्रवादीची आघाडी तोडा आम्ही आघाडी करण्यास तयार असल्याचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. निवडणुकांच्या तारखा झाल्या तरी दोन्ही पक्षातील जागा वाटपाबाबत वाद संपला नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागा निवडणूक लढणार असे घोषित केल्याने आता आघाडीची शक्यता धूसर झाली आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडणार असल्याने याचा फायदा शिवसेना भाजप आघाडीला होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून वंचित आघाडी ही भाजप-शिवसेनेची बी टीम असल्याचा पहिल्यापासूनच आरोप करीत असल्याने हे सिद्ध होणार का? हे आता मतदारांच्या हाती राहिले असून २३ मे रोजी यांचे उत्तर मिळणार असल्याने तो पर्यत वाट पाहावे लागणार आहे.